Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी..
मुंबईत सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच आपत्कालीन उपाययोजना व व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली असून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात गेल्या 12 तासात सुमारे 252 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने शहरात जागोजागी पाणी साचले. आता घाटकोपर, सायन, मीलन सबवे, अंधेरी सबवे, किंगसर्कल, हिंदमाता अशा सखल परिसरातील पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 15 दिवस आधीच मान्सून एवढा पाऊस पडला, त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मात्र यापुढे अशी परिस्थिती राहणार नाही असेही याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
वरळी येथील मेट्रो 3 च्या भूमिगत स्टेशनला जोडणारी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली भिंत पडल्याने या स्थानकात पाणी गेले. हे पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून कायमस्वरूपी भिंत उभारल्यावर ही समस्या दूर होईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली असून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मंत्रालयात, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुण्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई मनपामध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याने राज्याची यंत्रणा सक्रिय असल्याचे यासमयी सांगितले. 7 जूनपर्यंत मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यावर अजून दिलासा मिळेल.
यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #Monsoon #HeavyRain #EknathShinde #Maharashtra
Girish Mahajan
रिपोर्टर