Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची अतिविराट जनसभा आज कल्याण येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
देशाला विकासाकडे नेणारे, भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे, देशाला महासत्तेकडे नेणारे, 140 कोटी भारतीयांना आपलं कुटूंब समजणारे, महिलांना सन्मान देणारे आणि सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणारे मोदीजीच आहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
कल्याण : प्रतिनिधी.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची अतिविराट जनसभा आज कल्याण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कालच वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला निवडणुक अर्ज दाखल केला. वाराणसीच्या जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेली उत्सुकता, प्रेम, समाधान हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी मला लाभली हे आमचे अहोभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जीवनप्रवास हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेसारखा आहे. मात्र तरीही आजवर एकदाही थकवा, उदासी मी पाहिलेली नाही. 2014 नंतर आजवर तीनवेळा ते कल्याणमध्ये आले. त्यांच्या येण्याने कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तिन्ही लोकसभेच्या जागा महायुतीचे उमेदवार जिंकल्यात जमा आहेत असा विश्वास याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान कायमच आपल्या भाषणातून विकसित भारताचे व्हिजन मांडतात. देशाला विकासाकडे नेणारे, भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे, देशाला महासत्तेकडे नेणारे, 140 कोटी भारतीयांना आपलं कुटूंब समजणारे, महिलांना सन्मान देणारे आणि सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणारे मोदीजीच आहेत.
इंडी आघाडी पूर्णपणे भरकटली आहे. त्यांना पाठींबा देणारे उबाठा देखील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णपणे विसरले आहेत. बाळासाहेबांना निर्बुद्ध म्हणणारा समाजवादी पक्ष चालतो, पाकिस्तानची बाजू घेणारे काँग्रेस चालते, महाराष्ट्र भवनाला विरोध करणारे फारुख अब्दुल्ला चालतात. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
यासमयी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ भाजप नेते, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील, आमदार राजू पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, मनसेचे ठाणे पालघर संपर्कप्रमुख अविनाश जाधव, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक रवी पाटील तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर