Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह काल रात्री उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचे वाटोळे केले असून तेच खरे गद्दार आहेत. उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे : विजय करंजकर.
नाशिक : प्रतिनिधी.
उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह रात्री उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून एकनाथ शिंदे त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान ओशेटे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर, इगतपुरी, शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
गेली 12 वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला होता, मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत माझ्याशी असा दगाफटका केला जाईल याची मला कल्पना नव्हती. उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचे वाटोळे केले असून तेच खरे गद्दार आहेत. उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे विजय करंजकर यांनी यावेळी सांगितले.
दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हाच सोडून दिले असून कार्यकर्त्यांला येणाऱ्या अडचणींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. फक्त मी आणि माझे कुटूंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात. त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोकं पक्ष सोडून गेले. 50 आमदार, 13 खासदार आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे करंजकर यांचे पक्षात स्वागत करत असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा यासमयी व्यक्त केली.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर