Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ.प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आपल्याला विश्वासात घेतले जात नसून आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
कल्याण : प्रतिनिधी.
उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ.प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्याला विश्वासात घेतले जात नसून आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत 40 वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने अनेक मंडळी शिवसेनेत येत असल्याचे मत यासमयी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर