Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज...
मालाडच्या आप्पा पाडा येथे लागली भीषण आग...
आगीचे भीषण स्वरूप 400 झोपड्या झाल्या खाक, कित्येक झोपडपट्टीतील कुठुंब झाले बेघर..
मुंबई : वृत्तसंस्था..
मुंबईत आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनधिकृत झोपडपट्ट्या अनधिकृत कामे, वातावरणात झालेला बदल गरमीचे वाढलेले तापमान इत्यादी कारणाने मुंबई नगरीत गेल्या काही वर्षात आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी होत नसली तरी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत आहे.
दिनांक 13 मार्च सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मुंबईतील मालाड पूर्व येथे असलेल्या आप्पा पाडायेथील आनंद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनासाठली दाखल झाल्या आहेत. पोलिसांचा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळाल्या माहितीनुसार, मालाड पूर्व परिसरात असलेल्या आप्पा पाडा येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत सिलेंडर बाटल्यांमध्ये गॅस भरण्याची कामे चालतात, याच भागात इमिठेशन कामात गॅस चा अनधिकृत पणे वापर केला जातो. अश्याच सिलेंडर चा स्फोट झाला असे स्थानिक लोकनकडून समजते आप्पा पाडा येथे असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. झोपडपट्टी असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरू लागली या आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी लागलेली ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ही आगा वीजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. ही झोपड्पट्टी डोंगरवार पसरलेली असल्याने अग्निशनम दलाला आग वीजविण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 400 पेक्षा झोपड्या या आगीत भस्मसात झाल्या असून कित्येक कुटुंब बेघर झाली असून आगीच्या ज्वाळांनी आणि धुरानी आकाश काळे केले यावरून लागलेल्या आगीचे प्रमाण भयंकर आहे हे दिसून येत आहे. अग्निशमन दल, मुंबई पोलीस, मनपा कर्मचारी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मदत कार्य करत आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
रिपोर्टर