Breaking News
गिरगावात बिल्डराच्या चुकीच्या सुरक्षा उपाय प्रणालीमुळे चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : - दक्षिण मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी..
नेहमीच काहीना काही त्रास सुरू असतो कधी दगड पडतात, कधी माती पडते, कधी फत्रे कोसळतात मनपा, पोलिसांत तक्रार होत नाही बिल्डर सर्वांना मनेज करतो म्हणून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. : स्थानिक रहिवाशी.
मुंबई / गिरगाव : संदिप शां. शिंदे
गिरगाव खत्तर गल्ली मध्ये श्रीपती ज्वेलस् पुनर्विकास प्रकल्प मुंबईतील प्रख्यात विकासक श्रीपती डेव्हलपर यांचे काम सुरू असून स्थानिक नागरिकांनी ये जा सुरू असते मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले रस्त्यावरून जातात अशावेळेस विकासकाने सुरक्षासाधने उपाय योजना अमलात आणावी, सुरक्षा उपाय योजना राबवावी असे मनपाचे बंधन आहे. असे असताना देखील विकासकाच्या निष्काळजीपणामुळे 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याचाच अर्थ सुरक्षा नियमाचे उल्लंघन करण्यात आले, क्रीषा हितेश पटेल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद वी. पी. रोड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पुनर्विकासाचे काम सुरू असताना उंचावरून दगड कोसळला दगड 8 वर्षीय क्रिषा हिच्या डोक्यावर पडल्या मुळे जागीच मुलीचा मृत्यू झाला अश्या घटना नेहमीच घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदर घटनेची चौकशी सुरु असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीपती डेव्हलपर यांना सह कंत्राट दार यास पोलिसांनी ताब्यात घेऊन तात्पुरत्या कारवाही नंतर सोडण्यात आले असून मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे कुटुंब गुजरात राज्यात गेले असून विकासकाने प्रकरण दबल्याची चर्चा विभागात जोरात सुरू आहे.
रविवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास श्रीपती ज्वेलस गिरगाव येथील 1 ली खत्तर गल्ली या ठिकाणी श्रीपती डेव्हलपर बांधकाम व्यावसायिकाचे इमारतीचे पुनर्निर्माण बांधकाम सुरू असताना, इमारतीच्या आवारातून सिमेंट काँक्रेटचा दगड क्रिया हिच्या डोक्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला. तरी सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. अश्या प्रकाच्या घटना येथे घडल्या असून शाळकरी मुलांची ये-जा असते गिरगावातील याच खत्तर गल्लीतून दररोज शाळकरी मुले आणि त्यांचे पालक, स्थानिक रहिवाशी तसेच कामानिमित्त येणारे लोकं हे ये जा करीत असतात. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका बरोबर पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिक श्रीपती डेव्हलपर आणि कंत्राटदार कंपनीला राज्य सरकार, पोलीस प्रशासन तसेच मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकून संबंधितानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख केशव मुळ्ये, निलेश शिरधनकर, उपविभाग प्रमुख अनिल शांताराम नागरे आणि दक्षिण मुंबई मनसे कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे राज्य सरकार, महानगर पालिकेला केली आहे. यावर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन काय कारवाही करतात हे पाहणे महत्वाचे आहे स्थानिक लोकांमध्ये श्रीपती डेव्हलपर यांच्या विरोधात नाराजीचे सूर उठत असून लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
रिपोर्टर