Breaking News
बारावी परीक्षांच्या निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबर २०२१ रोजीपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ) मध्ये अर्ज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार २५ सप्टेंबर २०२१ अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर