Breaking News
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
घटना चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल :- एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्य भर उमटले आहे याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना मुख्यंत्र्यांनी दिल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.
मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
रिपोर्टर